चिल्ली ईजारा येथे कवी निरंजन मुडे लिखीत ‘ढाकडा’ पुस्तकाचे भव्य प्रकाशन सोहळा संपन्न

चिल्ली ईजारा येथे कवी निरंजन मुडे लिखीत ‘ढाकडा’ पुस्तकाचे भव्य प्रकाशन सोहळा संपन्न
यवतमाळ प्रतिनिधी (सचिन उबाळे ) :-
महागाव तालुक्यातील चिल्ली ईजारा गावात बंजारा संस्कृतीचा ठसा उमटवणाऱ्या कवी निरंजन बळीराम मुडे लिखित ‘ढाकडा’ या बंजारा भाषेतील काव्यसंग्रहाचे प्रकाशन २ एप्रिल २०२५ रोजी किनवट तालुक्यातील सिंगोडा येथे जेष्ठ साहित्यिक भिमणीपुत्र मोहन नाईक यांच्या जन्मदिनी गोरबोली गौरव दिनानिमित्त बंजारा समाजातील प्रतिभावंत साहित्यिक कवी लेखक यांच्या उपस्थितीत विस्मरणीय सोहळा पार पडला होता.
दि.१० मे २०२५ रोजी कवी निरंजन मुडे यांची जन्मभूमी चिल्ली ईजारा गावातील नायक बन्शी चाफा राठोड, कारभारी शिवाजी रोडा राठोड, बाबुसिंग मुडे, दामू आडे, शिवानंद राठोड (उपसरपंच ग्रा.पं.चिल्ली ई.) शाम आडे, राजुसिंग राठोड (पोलीस पाटील ) मोतीराम डुकरे(माजी सरपंच ), रमेश चव्हाण, शाम जाधव, बाळू आडे (माजी सैनिक ), शंकर आडे, सुरेश राठोड, इंदल भिवा राठोड, शेषराव राठोड ( महाराज ), रमेश रोडा राठोड, रुपसिंग मुडे, रमेश बळीराम राठोड, अमोल राठोड, सुदाम जाधव, सुदाम आडे, रवी हामु राठोड, पिका राठोड, रवी चंपत जाधव, पवन मुडे, सुधाकर राठोड, अरविंद मुडे व सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत गावपातळीवर हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते, स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब यांच्या प्रतिमेस अभिवादनाने झाली.
कवी निरंजन मुडे यांचा “‘ढाकडा कवितासंग्रह’ म्हणजे आमच्या मातीतल्या संघर्षांचा, संस्कृतीचा, आणि अस्मितेचा आवाज आहे.” प्रत्येकाने ढाकडा कवितासंग्रह वाचावा आपल्या संग्रही ठेवावा असे विलास जाधव (प्रयोग शाळा सहाय्यक वणी) यांनी बंजारा संस्कृतीचे जतन करणाऱ्या तरुणांना प्रेरणा देणारे विचार मांडले.
गावकऱ्यांनी मोठ्या अभिमानाने सांगितले की, “चिल्ली गावातून असा एक कवी पुढे यावा, ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे.”
हा सोहळा केवळ एक प्रकाशन नव्हता, तर बंजारा समाजाच्या वैभवाची, शब्दांनी घडवलेल्या इतिहासाची आणि संस्कृतीच्या अभिमानाची जणू साक्ष आहे असे शंकर आडे यांनी आपले मनोगतात सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास जाधव प्रयोग शाळा सहाय्यक वणी यांनी केले तर कवी निरंजन मुडे यांनी उपस्थित ग्रामस्थांचे आभार मानले..